मुख्य सामग्रीवर वगळा

उसाचा रस आणि आपले आरोग्य


         उसाचा रस आणि आपले आरोग्य 


उसाचा रस हे नैसर्गिक पेय असून आपल्या आरोग्यालाही तो फायदेशीर आहे. अनेक रोगांवरही उसाचा रस गुणकारी आहे.
उन्हाळ्यात थंडावा देण्याचं कामही उसाचा रस करतो. अशा या बहुगुणी उसाच्या रसाविषयी जाणून  घेऊयात .

उसाचा रस चवीला गोड असतो. तो मुत्रल, रेचक , शीत तसेच उत्साहवर्धक असतो, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो .

खोकला, दमा, पंडुरोग, त्वचेच्या विकारांवर हा रस गुणकारी ठरू शकतो.

उसाच्या रसामध्ये साखर हि नैसर्गिक रुपामध्ये असते. त्यातील साखर व रोजच्या वापरातील साखर यात फरक आहे. त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका संभवत नाही.

उसाचा रस कावीळ या रोगावर अत्यंत गुणकारी आहे. कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस नेहमी पिणे फायदेशीर आहे.

कावीळ झाली असल्यास उसाचा रस आणि रोज सकाळी उस खाल्ल्यास कावीळ लवकर बरी होण्यास मदत मिळते.
        ( काविळीच्या रुग्णांनी आले, लिंबू आणि बर्फ न घालता फक्त उसाचा रस पिल्यास कावीळ ५० टक्के वेगाने बरी होते.)

मूत्ररोग आणि कीडनीशी सबंधित रोगावरदेखील उसाचा रस फायदेशीर आहे.

उसाचा रस हा थकवा घालवून उत्साह वाढवणारा असल्यामुळे खेळाडू, अथलटिक   यांना फायदेशीर आहे.

कृत्रिम थंड पेये शरीराला तात्पुरता थंडावा देतात खरी पण याचे दुष्परिणाम खूप आहेत. याउलट उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

उसाचा रस हा नैसर्गिक असल्यामुळे लहानांपासून ये वृद्धापर्यंत सर्वजण पिऊ शकतात

१-४ वर्षापर्यंतच्या बालकांनी मात्र उसाचा रस थोड्या प्रमाणातच घ्यावा.

उसाचा रस हा नाशवंत असल्यामुळे तो पिण्याआधी ताजा असणे फार महत्त्वाचे आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रांगोळी डिझाईन

101 Easy Rangoli designs | रांगोळी डिझाईन | simple Rangoli designs पुढील लिंकवर क्लिक करा. https://youtu.be/Vpf6ZnJXLCI

देवाच्या सोप्या रांगोळ्या | Easy Rangoli Holy sings - 1 Marathi Gruhini

देवाच्या सोप्या रांगोळ्या | Easy Rangoli Holy sings  - 1 Marathi Gruhini https://youtu.be/iJ5lbZiGY8c

दागिन्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे - मराठी गृहिणी

दागिन्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेद सांगतो. ज्या धातूचे दागिने असतात त्यांचा प्रभाव शरीरावर होतो. ते आपल्या शरीरातील काही नलिकाबिंदूंवर दबाव टाकतात आणि त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि मन व शरीर प्रसन्न राहते. आयुर्वेदाच्या अनुसार सोन्याच्या दागिन्यांना कमरेच्या वरील भागातील अंगावर तर चांदीच्या दागिन्यांना संपूर्ण शरीरभर परिधान केले पाहिजे, असे मानले जाते. ◆ अंगठी ◆ हाताच्या प्रत्येक बोटात अंगठी घालण्याची पद्धत आहे. अंगठी बोटात घातल्यास ती अनेक प्रकारच्या रोगांवर प्रभावी ठरते. मसलन आणि कनिष्टिका म्हणजे शेवटचे लहान बोट (करंगळी) आणि तिच्या जवळचे बोट यांच्यात अंगठी घातली की घबराट, हृदयरोग, हृदयशूल आणि मानसिक तणाव यांपासून होणारा त्रास कमी होतो. कफासंबंधीच्या तक्रारी, प्लिहा, लिव्हर याबाबतीतल्या ज्या तक्रारी असतात, त्या सोन्याची अंगठी घातली असता कमी होतात, तर पित्त-वाताच्या विकारांवर व पचनासंबंधीच्या तक्रारींबाबत चांदीची अंगठी घालणे फायदे