मुख्य सामग्रीवर वगळा

दिवाळीनंतर शरीर डिटॉक्स करा ह्या घरगुती उपायाने

         दिवाळीनंतर शरीर डिटॉक्स  करा ह्या                                  घरगुती उपायाने



       सणाच्या दिवसांत किती ही नको म्हटलं तरी जास्त खाणं हे होतंच. कधी उत्साहाच्या भरात तर कधी आग्रहाखातर आपण एक घास किंवा गोडाधोडाचे पदार्थ अधिकच खातो. या सगळ्या गोष्टी दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांत तर आवर्जून होतातच. 


      कारण या दिवसांत तुम्हाला दिवाळीचा फराळ आणि मिठाई हे पदार्थ अधिक आकर्षित करतातच. पण अशावेळी मनात कोणताही विचार न आणता दिवाळी मस्त आनंदाने साजरी करावी. आणि त्यानंतर शरीर डिटॉक्स  करण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी पुढे चार उपाय दिले आहेत जे तुम्हाला खूप उपयोगी येतील


1) लिंबू 



लिंबूमध्ये योग्य प्रमाणात विटामीन सी असतं. लींबूमुळे तुम्ही सर्दी आणि खोकल्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. तसेच लींबू तुमची पचनशक्ती देखील चांगली करत. लिंबाची साल देखील अँटी ऑक्सिडेट्स असते यामुळे डिटॉक्सिफिकेशन अधिक होते. 

2) कोथिंबीर



कोथिंबीरमुळे देखील पचनशक्ती चांगली होते. यामुळे कोलेस्ट्रॉल देखील चांगला राहतो. कोथिंबिरीमुळे शरीरातील लेड आणि मरकरीचे प्रमाण कमी होऊन त्याचे डिटॉक्स होते. कोथिंबीर तुम्ही सलाड, डाळ आणि कढीमध्ये भरपूर प्रमाणात टाकून खावू शकतात.


3) टॉमेटो



टॉमेटो तुमच्या शरीरातील डिटॉक्स अतिशय चांगल्या प्रमाणात करतात. सणाच्या दिवसांत जेवण अधिक झाल्यावर शरीरात समतोल राखण्यासाठी पुढच्या जेवणात टॉमेटोचा वापर अधिक करावा.

4) दही 



एक वाटी दही कायमच शरीरासाठी चांगल असतं. दह्यामध्ये प्रोबायॉटिक्स असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील पचनशक्ती सुधारते. कारण यामध्ये उपयुक्त बॅक्टेरिया असतात ज्याने अन्न पचनास मदत होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रांगोळी डिझाईन

101 Easy Rangoli designs | रांगोळी डिझाईन | simple Rangoli designs पुढील लिंकवर क्लिक करा. https://youtu.be/Vpf6ZnJXLCI

देवाच्या सोप्या रांगोळ्या | Easy Rangoli Holy sings - 1 Marathi Gruhini

देवाच्या सोप्या रांगोळ्या | Easy Rangoli Holy sings  - 1 Marathi Gruhini https://youtu.be/iJ5lbZiGY8c

दागिन्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे - मराठी गृहिणी

दागिन्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेद सांगतो. ज्या धातूचे दागिने असतात त्यांचा प्रभाव शरीरावर होतो. ते आपल्या शरीरातील काही नलिकाबिंदूंवर दबाव टाकतात आणि त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि मन व शरीर प्रसन्न राहते. आयुर्वेदाच्या अनुसार सोन्याच्या दागिन्यांना कमरेच्या वरील भागातील अंगावर तर चांदीच्या दागिन्यांना संपूर्ण शरीरभर परिधान केले पाहिजे, असे मानले जाते. ◆ अंगठी ◆ हाताच्या प्रत्येक बोटात अंगठी घालण्याची पद्धत आहे. अंगठी बोटात घातल्यास ती अनेक प्रकारच्या रोगांवर प्रभावी ठरते. मसलन आणि कनिष्टिका म्हणजे शेवटचे लहान बोट (करंगळी) आणि तिच्या जवळचे बोट यांच्यात अंगठी घातली की घबराट, हृदयरोग, हृदयशूल आणि मानसिक तणाव यांपासून होणारा त्रास कमी होतो. कफासंबंधीच्या तक्रारी, प्लिहा, लिव्हर याबाबतीतल्या ज्या तक्रारी असतात, त्या सोन्याची अंगठी घातली असता कमी होतात, तर पित्त-वाताच्या विकारांवर व पचनासंबंधीच्या तक्रारींबाबत चांदीची अंगठी घालणे फायदे